विजयादशमी दसरा
उषःकाली देवीचे सीमोल्लंघन केले जाते.या दिवशी बर्हाणपूर येथून पालखी व भिंगार येथूनपलंग यांचे आगमन होते.तसेच पालखीतून मिरवणूक पार पडून देवी पलंगावर
विश्रांती(श्रमनिद्रा) घेते.दसरा ह्या सणांचं मोठ्या उत्साहाने स्वागत होते. हा साडेतीन मुहुर्तातला एक मुहुर्त म्हणूनच दसऱ्याच्या मुहुर्तावर नवी खरेदी, नवे करार, नव्या योजनांच्या प्रारंभ इ. चांगल्या गोष्टी केल्या जातात. घर, गाडी, बंगला, खरेदी केला जातो. सोन्या - चांदीचे दागिने केले जातात. नवे व्यवसाय चालू केले जातात. नवी नाटके, चित्रपट ह्यांचे मुहुर्त होतात. पुस्तकं प्रकाशीत केली जातात.